पोस्ट्स

जानेवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
  विश्वविजेत्या भारतीय कन्या!  यापूर्वीच जर महिलांना संधी मिळाली असती तर त्यांनी असे यश पूर्वीच मिळवले असते. तसे पहिले तर भारतात सर्रास घरोघरी क्रिकेटचे वातावरण असतेच, निदान मुले काही झाले तरी क्रिकेट खेळायला जातातच जातात. आता त्यांच्या बरोबरीने मुलीही क्रिकेट  खेळताना दिसतील आणि त्यांना आयपीएल सुरु झाल्यावर हक्काचे व्यासपीठ मिळेल. कनिष्ठ गटात भारतीय  मुलींनी मिळवलेले हे यश म्हणजे उज्ज्वल भविष्याची नांदी आहे कारण त्यापासून प्रेरणा घेऊन आणखी मोठ्या  संख्येने मुली पुढे येतील. ---------------------------------                                              -------------------------------------- भा रतात क्रिकेट हा धर्मच झालेला आहे. त्यामुळे कोणतीही क्रिकेट मालिका असो की साधा गौरवनिधीचा  सामना त्याला भरगच्च प्रतिसाद मिळाला नाही असे कधी होत नाही. वास्तविक पाहता जागतिक पातळीवर हाताच्या बोटावर मोजावे इतक्या देशात खेळला जाणारा क्रिकेट  हा खेळ पण मागील अनेक वर्षे भारतीयांना याची मोठी भुरळ  आहे. पूर्वीच्या तुलनेत आता अत्याधुनिक सुविधा आल्या आणि नवनवीन दर्जेदार खेळाडूही  मोठ्या संख्येने पुढे येऊ लाग
इमेज
  खरेच मध्यावधी होतील? जेव्हा एकदा मार्ग बदलतो तेव्हा तो लालूच दाखवल्याने तिकडे गेला असेतो होता त्या ठिकाणच्या त्याच्या एकेकाळच्या सोबत्यांकडून सांगितले जाते तेव्हा आता तो परत येत असेल  तर तुमि त्याला भविष्यात कसे पावन करणार आणि नुसता पश्चात्ताप झाला म्हणून एखादा परत आला असे सांगून त्यावर विश्वास बसणे नवे सरकार येऊन इतका अवधी होऊन गेल्यावर शक्य नाही हे कुणालाही ठाऊक आहे. तेव्हा सरकार कोसळेल हि शक्यता धूसर होते आता समजा दिलेला शब्द पूर्ण झाला नाही म्हणून मदार नाराज असतील तर ते काय करू शकतील ? हा प्रश्न आहे. एकतर ते तिथेच राहतील किंवा जे ठरलेय ते पदरात पडून घेतील याहून दुसरे काही करण्यास त्यांना वाव फार कमी आहे कारण आधीच प्रकरण न्यायप्रविष्ट आहे .......................................................................................................................................................................................... म हाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक होतील का? हा प्रश्न खरे तर आता पडण्याची काहीही गरज नाही पण अलीकडच्या काही दिवसातील विविध पक्ष्याच्या नेत्यांच्या  प्रतिक्रिया पहि
कळू दे ज्याची त्याला औकात...  टाळी एका हाताने वाजत नाही एका बलाढ्य राजकीय पक्षाने आपल्या धोरणाचा भाग म्हणा, घमेंड म्हणा, सत्तापिपासूपणा म्हणा  पण  अशा पोटनिवडणुकीत थेट आपल्या पक्षाचा उमेदवार उतरवला आणि महाराष्ट्राची राजकीय संस्कृती मोडली म्हणण्यापेक्षा समंजसपणा दाखवला नाही .आता एकाने असे केले म्हटल्यावर  दुसरा संधी मिळताच  सोडेल असे होणे राजकारणात तरी शक्य नाही आणि त्यांनी तरी असे प्रत्येकवेळी आपले घोडे मागे का घ्यावे.. प्रत्येक  पक्षाला आपण विस्तार करावा आणि सत्ता काबीज करावी असे वाटले तर त्यात तो त्यांचा दोष नाही. ............................................................................................................................. रा जकारणात घमेंड नाही असे निदान आपल्या देशात तरी होणे शक्य दिसत नाही. एखादी पोटनिवडणूक असो कि प्रचार सभा असो, घमेंड दाखवल्याशिवाय राजकीय पुढारी  बोलला असे कधी होणार नाही . मागे वळून पाहिल्यास राजकीय पायंडे वेगळे होते, सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर तुटून पडायचे मात्र काय बोलायचे आणि काय बोलायचे नाही याची अलिखित मर्यादा सर्वजण पाळत असत, आजकाल तसे दिसत न