आपेशाचा धनी कामगार!
मुकेश अंबानीनी कर्मचाऱ्याला घर न देता, संस्था अडचणीत (नसली तरीसुद्धा) कशी आहे आणि आपण असेच राहिलो तर मरून जावू .मनोजजी, आपल्याला जोर करावा लागेल असे मिळमिळीत राहून नाही चालणार.त्या एअर टेलने पुन्हा एअरमध्ये (हवेत)आपली टेल (शेपटी)हलवण्यास सुरूवात केलेय,ध्यानात येत नाही का तुमच्या?इकडे आमचे बंधुराज अडचणीत आहेत.पोरापोरींची लग्न करून दिली..मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये डब्यात चाललाय, आता पैसा पुरवायचा कुठे आणि आणायचा कुठून? रात्ररात्र झोप लागत नाही.आता मिसेसला बोललो, रोज बाजारात जावून भाजी आण आणि साधाच काय तो स्वयंपाक कर. आपल्याला आता स्वयंपाकी आणि घरकामगार ठेवण्याची चैन नाही परवडणार..मीसुद्धा व्यायाम म्हणून इतर कामे करत जाईन.कोणत्याही कामात कमीपणा नसतो, अशी रड लावण्याची गरज होती जेणेकरून देशातील इतर उद्योजकांना एक नवा डायलॉग मिळाला असता मंदीच्या काळात पगारवाढ तर सोडाच पण कामगाराच्या पेकाटात लाथ घालून हाकलून देणारे जालीम मालक उदंड झालेले असतानाच,कामगारांमुळे आपली उद्योगसंस्था वाटचाल करतेय. त्यांचे योगदान नाकारता येत नाही,त्याबदल्यात आपण त्यांना देत असलेला पगार पुरेसा आहे का किंवा इतर सुविध